(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम

मुंबई ( ११ मार्च २०१९ ) : राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघात ४ टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक १८ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक २५ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २६ मार्च २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०१९ आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ११ एप्रिल २०१९ रोजी होईल. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या ७ मतदार संघात मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक १९ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक २६ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २७ मार्च २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २९ मार्च २०१९ आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान १८ एप्रिल २०१९ रोजी होईल. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० मतदार संघात मतदान होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २८ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक ४ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ५ एप्रिल २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ८ एप्रिल २०१९ आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान २३ एप्रिल २०१९ रोजी होईल. तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १४ मतदारसंघात मतदान होणार आहे.


चौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक ९ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १० एप्रिल २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०१९ आहे. चौथ्या टप्प्यासाठी मतदान २९ एप्रिल २०१९ रोजी होईल. चौथ्या टप्प्यात नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ मतदार संघात मतदान होणार आहे.

सर्व चारही टप्प्यांमधील मतदानाची मतमोजणी ही २३ मे २०१९ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक हा २७ मे २०१९ आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget