मुंबई ( १६ एप्रिल २०१९ ) : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे जीवनकार्य तसेच त्यांच्या अहिंसा, जीव दया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण देतो. राज्यातील सर्व लोकांना, मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा