मुंबई ( ४ एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 14 मतदारसंघात आज 197 उमेदवारांनी तर एकूण 393 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. चौथ्या टप्प्यासाठी आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात 28 मार्चपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. आज तिसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख होती. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 14 (आजपर्यंत 22 उमेदवार), रावेर-9 (16), जालना-18 (39), औरंगाबाद 16 (42), रायगड 15 (27), पुणे-34 (47), बारामती-18 (31), अहमदनगर- 19 (31), माढा-12 (41), सांगली-11 (21), सातारा 3 (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग-6 (13), कोल्हापूर 9 (26) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी तर आजपर्यंत 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
चौथ्या टप्प्यासाठी आज 16 नामनिर्देशनपत्रे दाखल
उद्या दि. 5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 25 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. दिंडोरी मतदारसंघात आज एक (1), नाशिक 1 (4), पालघर 2 (3), भिवंडी 1 (1), कल्याण 2 (2), ठाणे 1 (1), मुंबई उत्तर (1), मुंबई उत्तर-पूर्व 1 (1), मुंबई उत्तर-मध्य 1 (2), मुंबई दक्षिण-मध्य 1 (1), मुंबई दक्षिण 1 (3), मावळ 1 (1), शिरुर 2 (2), शिर्डी 1 (2). चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार असून 12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात 28 मार्चपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. आज तिसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख होती. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 14 (आजपर्यंत 22 उमेदवार), रावेर-9 (16), जालना-18 (39), औरंगाबाद 16 (42), रायगड 15 (27), पुणे-34 (47), बारामती-18 (31), अहमदनगर- 19 (31), माढा-12 (41), सांगली-11 (21), सातारा 3 (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग-6 (13), कोल्हापूर 9 (26) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी तर आजपर्यंत 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
चौथ्या टप्प्यासाठी आज 16 नामनिर्देशनपत्रे दाखल
उद्या दि. 5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 25 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. दिंडोरी मतदारसंघात आज एक (1), नाशिक 1 (4), पालघर 2 (3), भिवंडी 1 (1), कल्याण 2 (2), ठाणे 1 (1), मुंबई उत्तर (1), मुंबई उत्तर-पूर्व 1 (1), मुंबई उत्तर-मध्य 1 (2), मुंबई दक्षिण-मध्य 1 (1), मुंबई दक्षिण 1 (3), मावळ 1 (1), शिरुर 2 (2), शिर्डी 1 (2). चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार असून 12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
टिप्पणी पोस्ट करा