शताब्दी रुग्णालयात जखमींची विचारपूस
मुंबई ( २ जुलै २०१९ ) : मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूस केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर उपस्थित होते.
मुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपत्कालिन यंत्रणा पूर्ण सक्रीय झाली असून, शासन यंत्रणा आणि मुंबई महापालिका समन्वयाने काम करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेकडूनही मदत देण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत एकाच दिवसात सुमारे साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील परिस्थितीवर सतर्कतेने नजर ठेवली जात आहे. आवश्यक तिथे मदत आणि आपत्कालिन यंत्रणा पोहचेल, असे प्रयत्न केले जात आहेत.
मालाड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख
मालाड मधील पिंपरोपाडा येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मुंबईत झालल्या अतिवृष्टीत मालाड येथे भिंत कोसळून अनेक लोकांना जीव गमवावा लागला, ही अतिशय दुर्देवी घटना आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांप्रती मी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटावे,यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.
मुंबई ( २ जुलै २०१९ ) : मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूस केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर उपस्थित होते.
मुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपत्कालिन यंत्रणा पूर्ण सक्रीय झाली असून, शासन यंत्रणा आणि मुंबई महापालिका समन्वयाने काम करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेकडूनही मदत देण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत एकाच दिवसात सुमारे साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील परिस्थितीवर सतर्कतेने नजर ठेवली जात आहे. आवश्यक तिथे मदत आणि आपत्कालिन यंत्रणा पोहचेल, असे प्रयत्न केले जात आहेत.
मालाड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख
मालाड मधील पिंपरोपाडा येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मुंबईत झालल्या अतिवृष्टीत मालाड येथे भिंत कोसळून अनेक लोकांना जीव गमवावा लागला, ही अतिशय दुर्देवी घटना आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांप्रती मी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटावे,यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा