(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नदीचे प्रदुषण रोखण्यासाठीचा कृती आराखडा ७ दिवसांत सादर करण्याचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या

वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नदीचे प्रदुषण रोखण्यासाठीचा कृती आराखडा ७ दिवसांत सादर करण्याचे निर्देश



मुंबई, मार्च, दि. १ : वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. नागपूर, भंडारा, कामठी,कन्हान, मौदा, पवनी येथून निघणाऱ्या प्रत्येक नाला,नदी यांचे मॅपींग करुन, छोटे नाले व ते मिळणाऱ्या नद्या असे वर्गीकरण करुन प्रत्येक ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत रोड मॅप तयार करावा, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्याबाबत यावेळी मंत्री ठाकरे यांनी सूचना केल्या.

बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,उर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

कमी खर्चीक प्रकल्प जसे की, बायोरेमिडेशन,नाले अडवून त्या ठिकाणी प्रक्रिया याबाबत विचार करावा. नदी स्वच्छता रोड मॅप तयार करताना मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन ७ दिवसांत सादर करावा. नाले सफाईबाबत एसओपी तयार करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. ठाकरे यांनी सर्व संबंधीत विभागांना केल्या. उपस्थित सर्व महापालिका, नगरपालिका यांना त्यांच्या क्षेत्रातून निघणाऱ्या घरगुती सांडपाण्याबाबत मॅपीग करुन,लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन ७ दिवसांत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले की,सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून निर्माण होणारे प्रक्रियाकृत सांडपाणी उद्योगांना दुय्यम वापरासाठी बंधनकारक करण्यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास सूचित करावे, जेणेकरुन उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर कमी होऊन, हे पाणी इतरत्र वापरता येईल. तसेच ज्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली नाहीत त्या ठिकाणी कमी खर्चात नाला टॅपींगद्वारे प्रदूषण कमी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात नागपूर शहरातून निघणाऱ्या सर्व नाल्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने सुधारित कृती आराखडा तयार करावा. तसेच नालेसफाई करताना त्यातून निघणारा गाळ हा नदी, नाल्याकिनारी न टाकता त्याचे शास्रोक्त पध्दतीने योग्य ते व्यवस्थापन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन वैनगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांची माहिती दिली. नागपूरमधून सांडपाणी घेऊन येणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी तसेच भंडारा, कामठी, कन्हान, मौदा येथील प्रक्रिया न केलेले सांडपाणी घेऊन येणारी कन्हान नदी यामुळे वैनगंगा नदीचे प्रदूषण होते, अशी माहिती देण्यात आली. नागपूर महापालिका आयुक्त यांनीही यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget