(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स,उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या

संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स,उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे - मुख्यमंत्री



सहकार्य करालॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका; शेवटचा इशारा

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल्समॉल्स प्रतिनिधींशी बैठक

 

            मुंबई दि १३ : गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावेकडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नयेहा शेवटचा इशारा आहेअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

            आज ते आहारनॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन,शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेपालिका आयुक्त इक्बालसिंह चहलपर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायरटास्क फोर्सचे डॉ शशांक जोशीडॉ तात्याराव लहानेअतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कीगेल्या ४ महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

 

स्वयंशिस्त खूप महत्वाची 

            पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले.

            मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारतीबंगलेसोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणेहॉटेलिंगमॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहेत्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

            मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला असल्याचे त्यांनी आपणास सांगितले. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे,वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे,जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्समॉल्सउपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहेआपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाहीपण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले.  लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहेसर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 नियम तोडत असतील तर कारवाई करा     

            पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सांगितले कीएकीकडे आम्हाला कोरोनाला पूर्णपणे रोखायचे आहे, पण असे करतांना अर्थचक्रही सुरूच ठेवायचे आहे. हे संतुलन राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे. १ फेब्रुवारीपासून कोरोना वाढतोय. आज सुमारे १५००० रुग्ण दिवसाला सापडले आहेत तर, १ लाख १० हजार सक्रीय रुग्ण राज्यात झाले आहेत. या वेगाने १५ एप्रिलपर्यंत २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतीलत्यामुळे गर्दीचे नियंत्रण ठेवणे व सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे हे सांगताना त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात तंत्रज्ञांच्या उपयोगाने गर्दीचे कसे व्यवस्थापन केले आहे त्याचे उदाहरण दिले.

 

            पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावेळी सूचना केलीकी हॉटेल्स संघटनांनी प्रत्येक प्रभागात त्यांची फिरती पथके तयार करून नियमांचे पालन होते आहे किंवा नाही ते तपासावे. सर्व पदाधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन त्यांना जाणीव करून द्यावी. एक स्टार किंवा दोन स्टार तसेच लहान उपाहारगृहांत नियम पाळत नसल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले.

 

            याप्रसंगी हॉटेल्स आणि उपाहारगृहे यांच्या संघटनांच्या वतीने गुरुबक्षसिंग कोहलीसुभाष रुणवाल,शिवानंद  शेट्टीश्री. रहेजा आदींनी शासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे तसेच प्रसंगी एसओपी न पाळणाऱ्या उपाहारगृहांना संघटनेतून काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वस्त केले. मॉल्समध्ये ४० ते ५० हजार लोक दररोज येताततेथे देखील कोविड मार्शल्स मास्क न घालणाऱ्याना दंड करतील व फूड कोर्टमध्ये देखील संख्या मर्यादित ठेवूथर्मल इमेजिग,संपर्काशिवाय पार्किंगचे देखील पालन केले जाईल, असे संघटनांनी सांगितले.

..................................

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget