मुंबई : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अनिल देशमुख यांनी लेखी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे ऍड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी. बी. आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्टया योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वतः हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.
सबब, मला मंत्री ( गृह ) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.
टिप्पणी पोस्ट करा