लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सम्यकस्मृतिंस विनम्र अभिवादन
दिवंगत वामनदादा कर्डक यांचे वारसदार *आयु. रविंद्र वामनदादा कर्डक* यांनी केलेले हे लेख
*युगकवी - वामनदादा कर्डक*
*जन्म : 15 ऑगस्ट, 1922*
*निधन : 15 मे, 2004*
युगकवी वामनदादा कर्डक यांचा आज सतरावा स्मृतीदिन ! त्यानिमित्त युगकवी - वामनदादा कर्डक यांच्या पावनस्मृतीस त्रिवार अभिवादन!
💐🙏🙏🙏🙏🙏💐
युगकवी *वामनदादा कर्डक* यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट, १९२२ रोजी झाला. वामनदादा अवघे तीन वर्षांचे असतांनाच दादांचे वडील तबाजी कर्डक यांचे निधन झाले. त्यानंतर प्रपंचाचा सर्व भार आई सईबाई तबाजी कर्डक व थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला. वामनदादा व लहान बहीण सावित्रीबाई लहान असल्याने सर्व काही आई व बंधू भागवायचे. तशी घरची अठरा एकर जमीन होती, तिथं कधी पिकायचं तर काही काळ धकुन जात असे. मग आईला रानात लाकडे वगैरे गोळा करून मोळ्या बांधून घेऊन त्या काही मैल पायी चालून देशवंडी ते सिन्नर पायपीट करत यावे लागत असे. त्याचे सात-आठ आणे मिळाल्यावर दोन-तीन आण्याच्या भाकरी आणाव्या लागत असत व आपल्या पोटाची खळगी भरावी लागत असे..!!
नंतर बालवयातला वामन घरची गुरं-ढोरं चारु लागला होता. घरी ही मदत करत असे. गावात जातीयतेचे वातावरण गंभीर होतेच, त्यात हे सारं करत असतांना दादा व परजातीची गुरे राखणारी मुले सुरपारंबी, विटीदांडू, आट्यापाट्या सारखे खेळ जोमाने खेळायचे. नंतर कालांतराने प्रापंचिक खर्च वाढू लागल्याने वामनदादांच्या थोरल्या बंधूनी मुंबई गाठली. काही कामधंदा करीत असतांनाच त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली. नोकरी लागताच काही दिवसांनी सर्वांना सदाशिव कर्डक यांनी मुंबईला बोलावून घेतलं. तिथे मग वामनदादा कर्डक आईला मदत म्हणून रोहयोचे काम करु लागले. नंतर दादांना रेल्वेत नोकरी मिळाली होती. तिथं एक महिन्याचा पगार न घेता सोडली. काही दिवसांनी हिंदुस्थान अनलिव्हर लि. मुंबईला नोकरी मिळाली तीही काही दिवसात पगार न घेताच सोडली. त्यानंतरही तिसरी नोकरी नाशिक नोटप्रेसला मिळाली तीही सोडली. मग जे मिळेल ते ते करत होते. कधी आइस्क्रीम विकणे, तर कधी रेल्वेखाणीत कोळसा वेचणे असे काही कामधंदे करत असतांना दादांना जवळच लेझीम पथकात लेझीम शिकवायचे काम मिळाले. ते करत असताना एकदा एक माणूस असाच पत्रं वाचून घेण्यासाठी याला-त्याला विनवणी करत तो अखेर दादांच्या जवळ आला व म्हणाला की, 'भाऊ एवढं माझं पत्र वाचून द्या की!' वामनदादांना लिहता वाचता येत नसल्याने ते त्या माणसावर चिडले व म्हणाले, 'मी काय करतोय दिसत नाही का?' त्यावर तो इसम माफी मागून निघून गेला ..!!
त्या गोष्टीचा दादा पस्तावा करीत जवळच शाळा असलेल्या ठिकाणी देहलवी नावाच्या एका इस्लामी प्राध्यापकांसमोर बसून रडू लागले. त्यावर प्राध्यापक दादाला म्हणाले की, 'अरे कर्डक तुम तो रो रहे हो, क्युँ ? क्या बात है ?' त्यावर दादा म्हणाले, 'सर! मुझे पढ़ना लिखना नहीं आता ..!!'
सरांनी हसत-हसत उस में रोनेवाली क्या बात है? बझार से अंकलिपी लो, बारह बार लिखो और पढ़ो, जल्दी सिख जाओगे ।' त्याचवेळी दादा धावतच घरी गेले आई कडून पैसे घेवून दोन रु.ची अंकलिपी घेतली. सरांनी सांगितल्या प्रमाणे केले व सरांना लिहून वाचून दाखवले. सरांनाही आनंद झाला. नंतर दादा दुकानावरील इंग्रजी, मराठी पाट्यांवरील जोडाक्षरे वाचू लागले व अर्थ समजून घ्यायला लागले. अशातच विविध चळवळी चालू असताना त्यावेळचे सुप्रसिद्ध चित्रपट, कथा लेखक व गीतकार प्रदीप यांचं "आज कितने दिनों से हमको गुलाम करके पुकारा है " "दूर हटो ये दुनियावालों, ये हिंदुस्थान हमारा है " या गीताचे विडंबन केले. "आज कितने दिनों से हम को अच्छुत करके पुकारा है " "दूर हटो ये कॉंग्रेसवालो ये हिंदुस्थान हमारा है "
हे विडंबन गीत दादांनी चाळीतल्या सर्व लोकांना ऐकवले. टाळ्यांचा कडकडाट झाला व दादांना वाटलं की, 'मी आता कवी झालो आहे.' तिथून पुढे दादांचे लिखाण चालू झाले. दादांची प्रथम पत्नी अनुसया हिस दादांचे हे क्षेत्र आवडत नसे. ती सारखी 'दुसरं काही बघा!' म्हणत असे, पण दादाही ऐकत नव्हते. त्यावेळी दादांना एक मुलगी 'मीरा' झालेली होती. व्यवस्थित रोजगार नसल्याने परिस्थितीला कंटाळून अनुसया मीराला घेवून निघून गेली. काही दिवसांनी दादा पत्नी अनुसयाला व मीराला घेवून आले, परंतु काही महिने थांबून परत अनुसया मीराला घेवून निघून गेली ती कायमचीचं. मग दादांचे मन काही रमेना. दादा पत्नी अनुसयाकडे शेवटचं विचारायला सासरी गेले, पण पत्नी यायला तयार नाही म्हटल्यावर दादा फक्त मीराला घेवून आले व आईकडे संभाळायला दिले. नंतर परिस्थिती अभावी व उपासमारीने मीरा जगू शकली नाही. तेव्हा दादा एक छोटासा कार्यक्रम करत होते. नंतरच्या काळात दादांना तीनदा टीबी झाला. त्यातून एकदा नाशिककरांनी, एकदा मालेगांवकरांनी, एकदा आयु. दादासाहेब रुपवते (अहमदनगर) यांनी वाचवले. नंतर दादांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेजवर अनेकदा कार्यक्रम मिळाले. औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजचे काम चालू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावर छत्री धरायचेही काही दिवस काम केले. नंतरच्या काळात दादांचे शांताबाईशी लग्न झाले. त्यांनी दादांना खूप साथ दिली. मुलेबाळे न झाल्याने व शांताबाई यांना दमा असल्याने चिडचिडी होत्या. मग शांताबाई यांची लहान बहीण राजूबाई वारल्यावर तीचा मुलगा रविंद्र हा दत्तक घेतला व व दिले...!!
दादांचे लिखाण चालू होते. गायनही चालू होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्यात त्यांनी सहभाग घेतला, आंबेडकरी चळवळीमध्ये दादांचा सहभाग होताचं..!!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या सुमारास दादा म्हणतात :- *मुंबई आमची थोर महाराष्ट्राची पोरं,*
*मुंबई वरती हक्क सांगती कोण कुठले चोर*
*बिजं लेऊनी न्यारी-न्यारी नटली जणू का ? नवरी,*
*आकाश सुद्धा पाहून लाजेल आमची मुंबई नगरी*
*लागे नजर दिसे सुंदर फुलली नवती म्हणून भवती,*
*घिरट्या घालती वरच्यावर..!!*
*मुंबईच्या रस्त्यावरती प्राणांच्या दिल्या आहुती,*
*रक्त सांडले वामन संगीनीला छाती,*
*गेले ते नर झाले अमर त्या नरांची व्हा दरांची,*
*परंपरा ही आमची थोरं..!!*
त्या वर बाबासाहेबांच्या विषयी दादा लिहितात :-
*चालवेना मार्ग फोड आले पाया,*
*ये गं भिमाई मला उचलून घ्याया..!!*
*आई तुझ्या छायेत वाढला हा पिंड,*
*मायेच्या पंखाखाली राहिलो अखंड,*
*कशी एकाएकी तोडलीस माया..!!*
*कुणी साथ ना दे कुणी हात ना दे,*
*उचलूनी मजला आपल्या कुशीमध्ये ना घे,*
*थकलाय वामन आता शिनली ही काया..!!*
*हर एक नेता भाग्यविधाता जरी तुम्हाला वाटे,*
*संघटनेचे तुकडे-तुकडे करती हेचं करंटे,*
*भासवती आम्हाला हेचं करवंदीचे काटे..!!*
*नवे-नवे हे नेते नवपथांचे निर्मिते,*
*मोडतोड करणारे नवग्रंथाचे निर्मिते,*
*एक पथाने कुठले जाणे फुटले सारे फाटे रे दादा..!!*
*वामन तू राहून दक्ष पूरवून हमेशा लक्ष,*
*कर भक्कम आता तू एक विरोधी पक्ष,*
*सोड हे सारे कलंडणारे लोटे...!!!*
*वेष खादीचा घेव्ऊन असा हा, देश दुःखात लोटू नकारे,*
*सुख आपुल्या घरी आणतांना, गळे कोणाचे घोटू नका रे....!!*
*बिना कफनाचा वामन बिचारा, गाडला काल खाचर करुनी,*
*भेटले छान झाले इथे पण, पुन्हा मसणात भेटू नका रे..!!*
*बंधू रं शिपाया, तू दे रं दे रुपाया,*
*चोळीच्या खणाला रं होळीच्या सणाला..!!*
*कधी कुठे ही झुकली नाही महाराष्ट्राची मान,*
*महाराष्ट्राचा मर्द मराठा होता असा महान...!!*
*नको घाबरु नको थरथरु, गडे माय मी तूझं लेकरु..!!*
*तुला पाहतांना मला भास होई,*
*उभी माझी आईच आहे जिजाई,*
*तुझे शील डागून तुडवील पायी,*
*आई हा शिवाजी असा नीच नाही,*
*तुला स्पर्श माते कसा गं करु..!!*
*आम्ही रामदासी हे महाराष्ट्र वासी,*
*नीतीने राहतो भितो पातकाशी,*
*म्हणे आज वामन अगे मायं काशी,*
*तुकोबाची वाणी ही तारी आम्हासी,*
*असे थोर आहेत माझे गुरु..!!*
*शिवरायाच्या ये छायेखाली मुळीचं नव्हती वाण,*
*आनंदाने नांदत होते हिंदू व मुसलमान..!!*
*मीचं माझ्या सासरी पहाटे उठून,*
*घुसळून ताक लोणी काढत होते मायं गं..!!*
*सांगा या वाडीला*
*माझ्या गुलछडीला*
*हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला..!!*
असे एकापेक्षा एक चित्रपट, लोकगीते, बुद्ध-कबीर-शिवाजी-फूले-शाहू-आंबेडकरी गीते ही 15000+ च्या वर लिहिणारे व बाबासाहेबांचा सहवास व स्पर्श जपणारे *युगकवी वामनदादा कर्डक यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्रिवार अभिवादन..!!* 👏👏👏
अभिवादक व लेखन.
आयु. रविंद्र वामनदादा कर्डक व परिवार नाशिक. 9420681989
*तुफानातले दिवे पेटले वामन तुझ्यामुळे,*
*भिमयुगाचे गीत गाऊ लागले वामन तुझ्यामुळे..!!*
*शाहू-फुले-आंबेडकरांची वाटचाल करत राहीला तू,*
*बुद्वाचीच शिकवण जीवनभर देत राहिलास तू,*
*अनेक शाहीर जन्मा आले वामन तुझ्यामुळे..!!*
*जीवनभर समाजासाठी झटत राहिलास तू,*
*जीवनभर आंबेडकर लिहिला, गायलास तू,*
*भीमबाबा आम्हास कळाले* *वामन तुझ्यामुळे..!!!*
*गीता-गीतातून आंबेडकरी चळवळ पुढे आणलीस तू,*
*ह्या दीन-दुबळ्यांसाठी किती कष्ट साहीलेस तू,*
*वैभवराज कवी बनला वामन तुझ्यामुळे..!!*
कविता लेखन :-
आयु. वैभव रविंद्र कर्डक नाशिक. 9404662919
टिप्पणी पोस्ट करा