(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संविधान दिनी आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संविधान दिनी आवाहन

 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

भारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा

भारतीय संविधान जगात सर्वोत्कृष्ट संविधान,

भारतवासियांची ताकदजगण्याचा मूलाधार

सामाजिकसांस्कृतिकभौगोलिक विविधतेचा देश

अखंडएकसंध ठेवण्याची केवळ संविधानात ताकद

सर्वधर्मसमभावमानवतावाद संविधानाचा गाभा

देशाची एकताअखंडता संविधानामुळे अबाधित

देशातील भावी पिढी संविधानसाक्षर करुन

लोकशाही  मुल्यांवरील विश्वास दृढ करुया

-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संविधान दिनी आवाहन

 

            मुंबईदि. 25 :- भारतीय संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधानभारतवासियांची ताकदजगण्याचा मूलाधार आहे. संविधानानं देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला आहे. सन्मानानं जगण्याचंइच्छेनुसार वागण्याचंनिर्भयतेने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. विकासाची समान संधी उपलब्ध केली आहे. राजकीयसामाजिकसांस्कृतिकभौगोलिक विविधता असलेला भारत अखंडएकसंध ठेवण्याची ताकद संविधानात आहे. सर्व जातीधर्मपंथप्रांताच्या नागरिकांना एकजूट ठेवून त्यांच्या मनात एकतासमताबंधूतेचा विचार रुजवणं संविधामुळेच शक्य झालं आहे. सर्वधर्मसमभावमानवतावाद संविधानाचा गाभा आहे. देशाची एकताअखंडतासार्वभौमत्व संविधानामुळेच अबाधित आहे. भारतीय संविधानाचं हे महत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचादेशाच्या भावी पिढीला संविधान साक्षर करुन लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आज संविधान दिनाच्या निमित्तानं करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतील संविधान व लोकशाही व्यवस्थेचं महत्व अधोरेखित करुन समस्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री अजित पवार संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतांना म्हणाले कीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वर्ष 1949 मध्ये आजच्याच दिवशी  देशाला संविधान अर्पण केलं. या संविधानानं देशातील प्रत्येकाला मानसन्मान व समानतेचा हक्क दिला. संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्यसमता व बंधूतेच्या विचारांचा अवलंब करुन देशाची एकताअखंडतासार्वभौमता अबाधित राखणं. देशाला एकजूट ठेवणारी सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ करणं हे आपलं  नैतिक व राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधान तसंच लोकशाही मूल्यांची  जपणूक करीत त्यांचं महत्व भावी पिढीपर्यंत पोहचवण्याचादेशाची लोकशाही अधिक मजबूत करण्याचा पुनर्निर्धार आज संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांनी करुयाअसं आवाहन करीत उपमुख्यमंत्र्यांनी महामानव डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले असून देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्याआहेत.

०००००००००


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget