(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन



            मुंबईदि. 25 :- मुंबईवरील 26/11 (2008) दहशतवादी हल्ल्यावेळी शहराचं रक्षणनागरिकांचा जीव वाचवताना मुंबई पोलिसएनएसजीगृहरक्षकअग्निशमनसर्वच सुरक्षा दलांच्या अधिकारीजवानांनी असामान्य धैर्यशौर्यपराक्रमाचं दर्शन घडवलं. सामान्य मुंबईकरांनंही हल्ल्याचा निर्धारानं सामना केला. संयम पाळला. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. आत्मघातकी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची ऐतिहासिक कामगिरी घडली. सव्वीस-अकराच्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांच्या त्यागालाशौर्यालादेशभक्तीला तोड नाही. प्रत्येक भारतवासी या शहीदवीरांच्या त्यागाबद्दल कृतज्ञ राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

            मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पोलिसांनीसुरक्षा दलांनी बजावलेली कामगिरी हा देशाचा गौरवशाली इतिहास आहे. मुंबईच्या रक्षणासाठी पोलीस दलातील प्रत्येक अधिकारीजवान त्यावेळी स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून कसाबसारखा आत्मघातकी दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशरक्षणासाठी बजावलेलं कर्तव्यकेलेला त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य भावी पिढीला देशसेवेचीकर्तव्याची जाणीव करुन देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करीलअसेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

            दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना सैन्यदलराष्ट्रीय सुरक्षा दलगृहरक्षक दलअग्निशमन दलभारतीय रेल्वेआरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारीताजमहल व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही देशभक्तीसाहसमानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या कामगिरीचं स्मरण करुन त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राज्य पोलिसांनी कोरोनाकाळात बजावलेल्या कामगिरीचं कौतुकही उपमुख्यमंत्र्यांनी केलं. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचं पोलिस दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानप्रशिक्षणाच्या संदर्भात जागतिक तोडीचं असेल. पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईलयासाठी शासन व नागरिकांनी मिळून प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

००००००००


 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget