(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाआवास अभियान – टप्पा 2 चा शुभारंभ 5 लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ | मराठी १ नंबर बातम्या

महाआवास अभियान – टप्पा 2 चा शुभारंभ 5 लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 


            मुंबईदि. 23 : गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊअसा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला.

            महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ आज ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला. या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तारअपर मुख्य सचिव राजेश कुमारग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्तआदिवासी विकास आयुक्तउपायुक्त (विकास)जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीप्रकल्प संचालकगटविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

            ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ म्हणालेराज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान - ग्रामीण (टप्पा-1) मध्ये 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर  50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्पा-1 मध्ये 4 लाख 25 हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-2 हा 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

            राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणालेबेघर व्यक्तींना घरे देण्यात काही अडचणी येत असेलत्यांच्या घरांकरिता रेतीवाळूआदी साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असतीलतर त्या शासन स्तरावर तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या घरांकरिता काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असून ती रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास त्याही प्राधान्याने सोडविल्या जातील. या महा आवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीयविभागीयजिल्हास्तरीयतालुकास्तरीय तसेच ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची कल्पना अतिशय उत्तम असल्याचे श्री.सत्तार यांनी यावेळी सांगितले.

            अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार म्हणालेमहाआवास अभियान टप्पा-1 मध्ये संस्था आणि व्यक्तींनी खूप चांगले काम केले आहे. राज्यातील गरीबांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांचा बांधकाम कालावधी हा आज 1 वर्षाचा असून तो आणखी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी आय.आय.टी. मुंबईच्या मदतीने राज्यातील 1 हजार 300 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची तांत्रिकदृष्ट्या क्षमता बांधणी केली असल्याने या अभियानाकरिता यांचा निश्चितच उपयोग होणार असल्याचेही राजेशकुमार म्हणाले.

            याप्रसंगी मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 च्या घडीपुस्तिका तसेच पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणच्या महाआवास हेल्पलाईन 1800 22 2019 हा टोल फ्री क्रमांकही सगळ्यासाठी खुला करण्यात आला.

000


 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget