(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सर्वांच्या आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी | मराठी १ नंबर बातम्या

सर्वांच्या आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी



 

            समाज प्रबोधक श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहेजीवनविद्या मिशन ही सामाजिक  शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करतेअंधश्रध्दा निर्मूलनव्यसनमुक्तीपर्यावरण जागृतीभेदभाव नष्ट करणेस्त्री-सन्मानशालेय विद्यार्थी  तरुण युवा यांच्याकरिता बाल  युवा संस्कार अभियानेकार्यशाळा असे विविध प्रकारचे कार्य करून हे जग सुखी व्हावे  राष्ट्र पुढे जावे यासाठी कार्यरत आहे.

            याच कार्याबरोबर जीवनविद्या मिशन ही शासनासोबत ग्राहक संरक्षणअवयव दानविविध व्यसनांच्या दुष्परिणाबाबत जागृतीसह गावाचा सर्वांगिण विकास करणे  सर्वच बाबतीत दत्तक घेतलेली गावे आदर्श गाव बनविणे या उद्देशाने ग्रामसमृद्धी अभियान तसेच शेतकरी आत्महत्या थांबविणे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मानसिक सबलीकरण असे अनेकविध अभियाने संयुक्त विद्यमाने राबवित आहेत्याचबरोबर विविध कार्पोरेट  सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्येही अधिकारी  कर्मचारी यांच्यासाठी  Enjoy Your Work, Stress Management या विषयाबाबतच्या कार्यशाळा आयोजित करून जीवनविद्या मिशन कार्य करीत आहे.

            भारत देशाचा केंद्रबिंदू असलेल्या खेड्यांचा सर्वांगिण विकास व्हावायासाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरु केले आहेत्यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आलेत्यामुळे ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेवून त्या गावाचा सर्वांगीण विकास करणे  ते गाव सर्वच बाबतीत आदर्श गाव बनविणे याकरिता ग्रामसमृद्धी अभियान राबविणेबाबतचा प्रस्ताव जीवनविद्या मिशनने शासनास सादर केला आणि जीवनविद्या मिशनने केलेल्या कामांची दखल घेत त्यास मान्यता दिली.

            याअन्वये आता प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी  समृद्ध करून प्रत्येक गाव सक्षम करत गावातील भौतिक विकासासाठी सरकारीनिमसरकारी तसेच खाजगी संस्थाउद्योग समूहाचे आर्थिक सहकार्य मिळवूनगावातील भौतिक विकास कामे करण्याकरिता जीवनविद्या मिशन या संस्थेचे प्रशिक्षि कार्यकर्ते हे कार्य करणार आहेतयासाठी हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आणि त्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करतीलया अहवालाचे नियोजन ग्रामपंचायतीसोबत सभा करून पुढील उद्दिष्टांवर भर देऊन कार्य करणार आहे.

             यात स्वच्छ घरस्वच्छ परिसरहागणदारी मुक्त गावप्लास्टिक बंदीशून्य कचरा मोहीमघनकचरा व्यवस्थापनगाव  आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण  वृक्षसंवर्धनस्त्री सन्मानबेटी बचाव  बेटी पढाओमहिला सक्षमीकरणमहिला बचत गट यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण  सरकारी योजनांचे मार्गदर्शनगावागावांत रोजगार वाढीस लागावा  गावाकडून शहराकडे नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी येणारा लोंढा स्थानिक पातळीवरच आपले अर्थार्जन करू शकेलया उद्देशाने स्थानिक पातळीवर स्वयंरोजगार  व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणेआवश्यक असल्यास त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे ही महत्त्वाची उद्दिष्ट्ये असणार आहेत्याचबरोबर शेतकरी वर्गाला संघटीत करून सेंद्रीय शेती करण्याचे प्रशिक्षण देणे  सेंद्रीय शेतीजोड धंदाकुटीर उद्योग करण्यास प्रवृत्त करणेसरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे  राबविणेशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणेग्रामसमृद्धी अभियान अंतर्गत गावागावांमध्ये भौतिक विकास साधण्यासाठी सामाजिक दायित्व निधी (CSR) उपलब्ध करून देणेनैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर परंतू मोजका वापर करण्यास शिकवणेत्याचबरोबर संपूर्ण व्यसनमुक्त गावसंपूर्ण अंधश्रध्दामुक्त गावप्रत्येक घर सुखी करणेसंस्कार युक्त गावराष्ट्रभक्तीराष्ट्रप्रेम आणि राष्ट्रहीत भावना वृद्धींगत करुन उत्कृष्ट नागरीक घडवणेगावांतील भौतिक विकास कामांना सरकारी योजना  उद्योग समुहांच्या सहकार्याने गती देणे यावरही भर देण्यात येणार आहे.

            शासनाशी समन्वय ठेवण्याचे कामही जीवनविद्या मिशन करणार असून प्रत्येक गावांमध्ये चालत असलेल्या सर्व सरकारीनिमसरकारीखाजगीशैक्षणिक संस्थामध्ये आठवडयातून एक तास प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने एक तास मानवी जीवनमूल्यांचे संस्कारयुक्त प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहेततसेच ग्रामस्थव्यावसायिकविद्यार्थीपालक यांची मानसिकता बदलण्यासाठी जीवनविद्या तत्वज्ञानाचे ल्यात्मक संस्कार, शिक्षण ज्ञानविविध विषयांवरील कार्यशाळा सर्व स्तरांपर्यत पोहचविण्यासाठी मदत करणार आहे.

            जीवनविद्या मिशनला ही कामे सहजरित्या करता यावी म्हणून या संस्थेची सहयोगी मार्गदर्शक संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यापुढे ग्रामसमृद्धी अभियान राबविल्याने  ग्रामस्थांच्या विचारसरणीत नक्कीच परिणामकारक बदल होऊन गावातील प्रत्येकाचा मानसिकआध्यात्मिकआर्थिक आणि शारिरीक स्तर उंचावणार आहे.

            जीवन विद्या मिशनमुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करता येणार नाहीत्यामुळे सदर खर्च जीवन विद्या मिशनमुंबई या संस्थेने किंवा लोकवर्गणी मधून करण्यात येईलअसेही ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न असून प्रत्येक गाव अधिकाधिक सुखीसमृद्ध  सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशनमुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येत असल्याचे समाधान असल्याचे सांगून ग्रामविकास  कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

            आपण सर्वांनी हे ग्राम समृद्धी अभियानाचे कार्य पद्धतशीरपणे यशस्वी होण्यासाठी आणि ही सर्व उद्दिष्ट्ये साध्य करून प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यासाठी जीवनविद्या मिशन यांना ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी सहकार्य करू या !

·       संजय डी.ओरके,

 सहायक संचालक (माहिती)

000

 

 


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget