मुंबई, दि. 16 : गुहागर, रत्नागिरी येथे आणखी दोन ऑलिव्ह रिडले सी कासवांना वन विभागाच्यावतीने (सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले.
रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल 'वनश्री' नावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. यापूर्वी 'प्रथमा' आणि 'सावनी'ला वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते. अशा प्रकारे वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.
0000
टिप्पणी पोस्ट करा